Skip to main content

आकाशकंदील, मी, आणि पाऊस

दिवाळीच्या खरेदीमध्ये एक महात्वाची वस्तू म्हणजे आकाशकंदील. त्याच्याशिवाय दिवाळी अपूर्णच.

दरवर्षी कंदील आणायचा, "हा कंदील आपण पुढच्या वर्षीसुद्धा वापरू" असे ठरवायचे, आणि पुढच्या वर्षी "रंग उन्हात विटला" असे म्हणून नवीन कंदील आणायचा. त्यात नवीन ते काय! सालाबाद प्रमाणे ही परंपरा पार पाडत ह्या वर्षी आम्ही कंदील खरेदीसाठी गेलो. बरं यंदा कुठल्या प्रकारचा कंदील घ्यायचा हा निर्णय आमचा आधीच झाला होता. गेल्या वर्षी आम्ही एका घरी पिवळा, अगदी हळदीच्या रंगाचा पिवळा कंदील पहिला होता. त्या कांदिलातून प्रकाश खूप छान दिसत होता. बस्स, तेव्हाच ठरवले की पुढल्या वर्षी असाच कंदील घ्यायचा.

बाकी कंदील पारंपरिक, स्वदेशी (Make in India चा सिंह असेल तर उत्तमच, पण Made in China, Bangladesh, Pakistan असा कुठला nako), पिवळ्या रंगाचा, आणि स्वस्त्यातला, ह्या किरकोळ अपेक्षा. बरीच दुकाने पालथी घातली, पण पाहिजे तसा कंदील काही मिळेना. कुठे प्लास्टिकचे कंदील तर कुठे geletin पेपरचे. कुणी म्हणे चार दिवसांनी या (ह्या पट्ठ्याला कोण सांगणार चार दिवसांनी तर दिवाळी आहे). 

मी म्हटले जाऊ दे, आपण कंदील घरी करू. ज्या दुकानात कंदील आवडला नाही म्हणून दुकान मालकाला सगळे कंदील काढायला लावले त्यालाच म्हणाले card paper, crape paper आणि फेविकॉल द्या. चारशे रुपये देणारे गिऱ्हाईक पन्नास रुपयाचे सामान घेऊन जाणार म्हणून त्या दुकानदाराने रागातच सामान दाखवले. मी  पण "Customer is king" ह्या म्हणीप्रमाणे राजाज्ञा देत सगळ्या brands चे सगळे ऐवज पहिले आणि हवा तो रंग निवडला. "जांभळा पाहिजे तर हा कंदील घ्या. कशाला मेहनत घेता", एक शेवटचा प्रयत्न दुकानदाराचा.  "नको, त्या कंदीलाने खूप धूळ खाल्ली आहे."  असे म्हणत मी सामान घेतले आणि घरी आले. 

मला कंदील करणे काही फार कठीण नव्हते, मी खूप वर्ष घरी कंदील केले आहेत. एका तासात माझा कंदील तयार झाला, त्याचा गोंद रात्रभर सुकू दिला आणि दुसऱ्या दिवशी त्याला उच्चस्थानी बसवले. माझ्या कर्तबगारीचे मी स्वतः भरपूर कौतुक केले. Social media वर फोटो आणि रील्स टाकून जगभर दिंडी पिटली.

दोन दिवस कंदील छान वाऱ्यावर झोके घेत होता. मग उजाडला तो दिवस. पाऊसाची शक्यता हवामानखात्याने दिली आणि पर्जन्याने हजेरी लावली पवन साहेबाना घेऊन. एक तास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यात कंदीलला थोडी फार दुखापत झाली. रंग थोडा विटला. शेपट्या ज्या सरळ होत्या, त्यांनी trendy curls परिधान केले. सरळ बांधा arthritis झाल्यासारखा वाकला.

झाले ते वाईट झाले, पण दुसऱ्यांच्या घरात पहिले तर काय? जी स्थिती माझ्या घरगुती कंदीलची तीच त्यांच्या महागाड्या विकतच्या कंदीलाची. मग काय, ठेवला तसाच कंदील. मेहनतीचे फळ वाया कसे जाऊ देणार. मग मनाशी निश्चय केला. पुढल्या वर्षी कापडी कंदील करायचा. पण त्यासाठी आतापासूनचा youtube video बघावे लागतील. 

चला तर मग, सुरु करायचे का?

Comments

Popular posts from this blog

प्रथम वंदन

नमस्कार मंडळी.  माझ्या "श्रीगणेश पूजा विधि" या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकाला गणेश भक्तांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यामुळे मला मिळालेली उमेद असे सांगत होती की आपल्या हिंदू धर्मात अशा अनेक प्रथा आहेत आणि अशी माहिती आहे जी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ती जतन करणे आवश्यक आहे जसे की आजीबाईचा बटवा इत्यादी. याच्या अनुषंगाने मी विविध विषयांना आजपासून स्पर्श करण्याचा आणि ते विषय आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. अपेक्षा ही आहे की माझा हा संकल्प आपल्या पसंतीस उतरेल. कुठल्याही कामाची सुरुवात करताना गणेशाला वंदन करूनच आपण करतो.  ॐ गं गणपतये नमः | अष्टविनायकांची नावे याप्रमाणे:  मोरगावचा मयुरेश्वर  सिद्धटेकीचा सिद्धिविनायक  पालीचा बल्लाळेश्वर  मढचा वरदविनायक  थेऊरचा चिंतामणी  लेण्याद्रीचा गिरिजात्मक  ओझरचा विघ्नेश्वर  आणि आठवा रांजणगावचा महागणपती वाचकहो, ही सुरुवात आहे. दर आठवड्यातून एकदा मी आपल्या भेटीस येईन. प्रत्येक वेळी विषय वेगळा असेल, अशी माझी अशी माझी संकल्पना आहे. - आनंद कृष्णाजी कणेक...

अधिक मास व सहस्त्रचंद्रदर्शन

नुकताच अधिक मास समाप्त झाला. काहीजण त्याला मलमास, धोंडा मास, किंवा पुरुषोत्तम मास असेही संबोधतात. हा अधिक मास कसा झाला हे समजावून घेऊ. प्रत्येक महिन्यासाठी एक विशेष देवता आहे. अधिक मासाला मात्र देवता नव्हती. तरीही हा मास श्रेष्ठ मानला जातो तो कसा?  थोडे त्याच्या निर्मिती विषयी. श्री महर्षी व्यास सांगतात, एका वर्षातील बारा महिने म्हणजे एक चांद्र वर्ष होते त्याचा कालावधी अंदाजे ३५४   दिवसांचा. तर एका वर्षातील सूर्याचे बारा राशीतून संक्रमण म्हणजे एक सौर वर्ष. त्याचा कालावधी अंदाजे ३६५  दिवसांचा. त्यामुळे चंद्र वर्ष व सौर्य वर्ष यात दहा-अकरा दिवसांचा फरक पडतो. कालगणनेचा ताळमेळ बसण्यासाठी या दोघांचा मेळ बसवणे क्रमप्राप्त झाले. साधारण दर अडीच वर्षात ह्यामुळे तीस दिवसाचा फरक पडला, म्हणून चांद्र वर्षात एक अधिक मास घेऊन हे सांगड घातली गेली. आता हा महिना कसा ठरवावा? तर ज्या महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही, तो हा महिना धरला गेला. त्यामुळे त्या चांद्र वर्षात बारा ऐवजी तेरा महिने झाले. हा तेरावा महिना म्हणजेच अधिक मास. अधिक महिन्यात ठराविक ऋतू, सणवार, संक्रांत येत नव्हते. लग्न...

भेटीतला बंदा रुपया

शुभप्रसंगी भेट देणे ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. पूर्वी ती धातू स्वरूपात असे.. जसे की तांब्या-पितळेची भांडी, चांदीच्या वस्तू (उदाहरणार्थ पेला, वाटी, लामण दिवा,छल्ला, चौफुला, हळद कुंकवाचा करंडा, अत्तरदाणी, गुलाबदाणी), तर सोन्यामध्ये (कर्णफुले, हार, चेन, ब्रेसलेट, अंगठी, कडे इत्यादी).. दिवस पुढे जात होते व भेट स्वरूप पण बदलले.. मग आले स्टीलचे डिनर सेट, चांदी-सोन्याची नाणी.. आता चांदी-सोन्याचा दर पाहता हे लुप्त पावत आहे.. आधीच असलेल्या व वापरात नसलेल्या स्टील, क्रोकरीच्या वस्तू या भेट स्वरूपात आलेल्या असूनही वापरल्या जात नाहीत.. उलट त्याचे काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी छोट्या व टोकन स्वरूपात भेट म्हणून पाकिटात रोख रक्कम भरून दिली जाते. ती शंभर रुपये, पाचशे रुपये, हजार रुपये अशी नसते तर ती एकशे एक रुपये, पाचशे एक रुपये, एक हजार एक रुपये अशा स्वरूपात असते..आपण कधी याचा विचार केला आहे का, की हा एक रुपया अधिक स्वरूपात भेटीत का समाविष्ट केला जातो...... या मागचा विचार असा आहे..   शून्य हे अंत म्हणजेच शेवट दर्शवते. तर एक अंक ' नवीन सुरुवात'  याचे द्योतक आहे. कद...