Skip to main content

रांगोळी आणि मी

रांगोळीचे आणि माझे नाते खूप जुने आहे. 

बालपणापासूनच मला कलेची खूप ओढ होती. कधी चित्र काढावे तर कधी चित्र रंगावावे. कधी कलात्मक मांडणी करावी. कधी काही लिहावे. दरवर्षी जशी दिवाळी यावी तसं माझं मन धावायचं रांगोळी कडे. 

आधी आई रांगोळी काढत असे. मी आईच्या बाजूला बसून रांगोळी कशी काढतात ते पाहत बसे. एखादा रंग भरायला दे असा आग्रह करत असे. शेवटी माझ्या बडबडीला कंटाळून आई एखादा रंग भरायला देत असे. तो रंग भरून मी पण खुश होत असे. तेव्हा मी ठरवले की मोठी झाल्यावर मी मोठ्या मोठया रांगोळ्या काढीन.

थोडी मोठी (तिसरी चौथी मध्ये घेल्यावर) झाल्यावर मी रांगोळी काढण्याची कामगिरी स्वतः हाती घेतली. चार ठिपक्या पासुन रांगोळी काढायला सुरु केले. पण मजल फक्त 17 ठिपक्यांच्या रांगोळी पर्यंतच जाऊ शकली. मुंबईच्या flat बाहेर कितीशी जागा मिळणार, पण त्यातही माझे समाधान व्हायचे. दिवाळीचे सारे दिवस आमच्या दारापुढे रोज नवी रांगोळी असायची.

शिक्षण पूर्ण करून जेव्हा नोकरी सुरु झाली, तेव्हा मी घरी उशिरा यायचे. कितीही उशीर झाला तरी मी न चुकता रांगोळी काढायचे. एकदा रात्री 9 वाजता मी रांगोळी काढायला सुरुवात केली होती. दिवाळीच्या दिवशी नित्य नियामाने रांगोळी काढायचेच.

मग काही वर्षानंतर वाटले आपल्याला जर रांगोळी काढायला आवडतं तर आपण दिवाळीची वाट का पाहायची. प्रत्येक सांग खासच असतो. रांगोळी नेमही चित्त प्रफुल्लित करणारी असतें. तर आपण प्रत्येक सणाला रांगोळी काढू. आणि तेव्हापासून मी प्रत्येक छोटया किंवा मोठया सणाला दाराबाहेर रांगोळी काढते. 

जे आपल्याला आवडतं ते आपण नक्की करावे. YOLO या बाबतीत नक्कीच योग्य आहे. Joy of simple things ही संकल्पना आपल्या समाजात फारशी रुजलेली नाही. पण आपण अश्या साध्या सावयी किंवा आचरणाने त्या रुजवू शकतो.

Comments

Popular posts from this blog

प्रथम वंदन

नमस्कार मंडळी.  माझ्या "श्रीगणेश पूजा विधि" या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकाला गणेश भक्तांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यामुळे मला मिळालेली उमेद असे सांगत होती की आपल्या हिंदू धर्मात अशा अनेक प्रथा आहेत आणि अशी माहिती आहे जी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ती जतन करणे आवश्यक आहे जसे की आजीबाईचा बटवा इत्यादी. याच्या अनुषंगाने मी विविध विषयांना आजपासून स्पर्श करण्याचा आणि ते विषय आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. अपेक्षा ही आहे की माझा हा संकल्प आपल्या पसंतीस उतरेल. कुठल्याही कामाची सुरुवात करताना गणेशाला वंदन करूनच आपण करतो.  ॐ गं गणपतये नमः | अष्टविनायकांची नावे याप्रमाणे:  मोरगावचा मयुरेश्वर  सिद्धटेकीचा सिद्धिविनायक  पालीचा बल्लाळेश्वर  मढचा वरदविनायक  थेऊरचा चिंतामणी  लेण्याद्रीचा गिरिजात्मक  ओझरचा विघ्नेश्वर  आणि आठवा रांजणगावचा महागणपती वाचकहो, ही सुरुवात आहे. दर आठवड्यातून एकदा मी आपल्या भेटीस येईन. प्रत्येक वेळी विषय वेगळा असेल, अशी माझी अशी माझी संकल्पना आहे. - आनंद कृष्णाजी कणेक...

अधिक मास व सहस्त्रचंद्रदर्शन

नुकताच अधिक मास समाप्त झाला. काहीजण त्याला मलमास, धोंडा मास, किंवा पुरुषोत्तम मास असेही संबोधतात. हा अधिक मास कसा झाला हे समजावून घेऊ. प्रत्येक महिन्यासाठी एक विशेष देवता आहे. अधिक मासाला मात्र देवता नव्हती. तरीही हा मास श्रेष्ठ मानला जातो तो कसा?  थोडे त्याच्या निर्मिती विषयी. श्री महर्षी व्यास सांगतात, एका वर्षातील बारा महिने म्हणजे एक चांद्र वर्ष होते त्याचा कालावधी अंदाजे ३५४   दिवसांचा. तर एका वर्षातील सूर्याचे बारा राशीतून संक्रमण म्हणजे एक सौर वर्ष. त्याचा कालावधी अंदाजे ३६५  दिवसांचा. त्यामुळे चंद्र वर्ष व सौर्य वर्ष यात दहा-अकरा दिवसांचा फरक पडतो. कालगणनेचा ताळमेळ बसण्यासाठी या दोघांचा मेळ बसवणे क्रमप्राप्त झाले. साधारण दर अडीच वर्षात ह्यामुळे तीस दिवसाचा फरक पडला, म्हणून चांद्र वर्षात एक अधिक मास घेऊन हे सांगड घातली गेली. आता हा महिना कसा ठरवावा? तर ज्या महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही, तो हा महिना धरला गेला. त्यामुळे त्या चांद्र वर्षात बारा ऐवजी तेरा महिने झाले. हा तेरावा महिना म्हणजेच अधिक मास. अधिक महिन्यात ठराविक ऋतू, सणवार, संक्रांत येत नव्हते. लग्न...

भेटीतला बंदा रुपया

शुभप्रसंगी भेट देणे ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. पूर्वी ती धातू स्वरूपात असे.. जसे की तांब्या-पितळेची भांडी, चांदीच्या वस्तू (उदाहरणार्थ पेला, वाटी, लामण दिवा,छल्ला, चौफुला, हळद कुंकवाचा करंडा, अत्तरदाणी, गुलाबदाणी), तर सोन्यामध्ये (कर्णफुले, हार, चेन, ब्रेसलेट, अंगठी, कडे इत्यादी).. दिवस पुढे जात होते व भेट स्वरूप पण बदलले.. मग आले स्टीलचे डिनर सेट, चांदी-सोन्याची नाणी.. आता चांदी-सोन्याचा दर पाहता हे लुप्त पावत आहे.. आधीच असलेल्या व वापरात नसलेल्या स्टील, क्रोकरीच्या वस्तू या भेट स्वरूपात आलेल्या असूनही वापरल्या जात नाहीत.. उलट त्याचे काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी छोट्या व टोकन स्वरूपात भेट म्हणून पाकिटात रोख रक्कम भरून दिली जाते. ती शंभर रुपये, पाचशे रुपये, हजार रुपये अशी नसते तर ती एकशे एक रुपये, पाचशे एक रुपये, एक हजार एक रुपये अशा स्वरूपात असते..आपण कधी याचा विचार केला आहे का, की हा एक रुपया अधिक स्वरूपात भेटीत का समाविष्ट केला जातो...... या मागचा विचार असा आहे..   शून्य हे अंत म्हणजेच शेवट दर्शवते. तर एक अंक ' नवीन सुरुवात'  याचे द्योतक आहे. कद...