Skip to main content

दिवाळी आणि बरंच काही

तो दिवस उजाडला. आजच तो दिवस. आज सगळे भेटणार. दिवाळीच्या एका आठवड्या नंतर का होईना पण भाऊबीजसाठी सगळे येणार. 

खरंच आधी लहानपणी किती वेळा भेट होत असे. आता सगळे स्वतःच्या routine मध्ये गर्क असतात. पण त्याला ही कारण आहे. लहानपणी कुठे ऑफिस होते. लहानपणी कुठे client meetings होत्या. लहानपणी मस्त दिवाळीची सुट्टी (आणि नकोसा दिवाळीचा अभ्यास). 

एरवी खूप कंटाळा करणारे सुद्धा अगदी वेळेवर उठले. Weekend असतानाही लवकर आंघोळी केल्या. इस्त्री नीट घडी असलेले नवीन कपडे घातले. मग वाट बघतली, कोण कधी येतंय. Whatsapp वर विचारायचं का कुठे पोचले की फोन करायचा? पण गाडी चालवत असताना कसे रिप्लाय करेल. ट्रॅफिक लागला असेल कदाचित. जाऊदे येतील सगळे वेळेवर. डोक्यात शंभर विचार. 

ताटे काढली का? एवढी बस होतील कि अजून लागतील? चमचे थोडे जास्त घेऊ. चमचे कितीही असले तरी कमीच पडतात. आणि पेल्यांच काय? Disposable cups घेऊ तेवढाच जरा व्याप कमी. दोन चार सर्विन्ग बाउल्स आणि दोन चार मोठे चमचे वाढायला. पाणी लागेल तेव्हाच भरून घेऊ. बाकी सगळी तयारी झाली.

एका मागोमाग एक सगळे आहे. घर उत्स्फूल्लीत झालं. गप्पा आणि हास्याची मैफिल जमली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गप्पा रंगल्या. भावांची ओवाळणी झाली. 

जेवणाची तयारी होत होती आणि गप्पाना ऊत आला. राजकारण, इतिहास, संस्कृती, ऑफिसचे किस्से, नावे अनुभव, अशा नानाप्रकारच्या चर्चा झाल्या. एवढ्यात जेवणाची ताटे आली पण गप्पा मात्र चालू राहिल्या. 

जेवण झाल्यावर पांगपंग सुरु झाली. ज्येष्टांना नमन करून हळूहळू परतीचा मार्ग गाठू लागले. दिवाळी to दिवाळी का आपण लवकर काहीतरी प्लॅन करूया असे ठरले. एकदा कुठेतरी family picnic काढूया असा एक प्लॅन झाला. घरी पोचलात कि family group वर मेसेज टाका अशी common सूचना आली आणि सगळे फोटो group वर टाका अशी विनंती सुद्धा. 

दिवसाची सांगता. आठवणींचा नवा ठेवा. नव्हचैतन्य आणि पुन्हा भेटण्याची आतुरता. 

Comments

Popular posts from this blog

प्रथम वंदन

नमस्कार मंडळी.  माझ्या "श्रीगणेश पूजा विधि" या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकाला गणेश भक्तांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यामुळे मला मिळालेली उमेद असे सांगत होती की आपल्या हिंदू धर्मात अशा अनेक प्रथा आहेत आणि अशी माहिती आहे जी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ती जतन करणे आवश्यक आहे जसे की आजीबाईचा बटवा इत्यादी. याच्या अनुषंगाने मी विविध विषयांना आजपासून स्पर्श करण्याचा आणि ते विषय आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. अपेक्षा ही आहे की माझा हा संकल्प आपल्या पसंतीस उतरेल. कुठल्याही कामाची सुरुवात करताना गणेशाला वंदन करूनच आपण करतो.  ॐ गं गणपतये नमः | अष्टविनायकांची नावे याप्रमाणे:  मोरगावचा मयुरेश्वर  सिद्धटेकीचा सिद्धिविनायक  पालीचा बल्लाळेश्वर  मढचा वरदविनायक  थेऊरचा चिंतामणी  लेण्याद्रीचा गिरिजात्मक  ओझरचा विघ्नेश्वर  आणि आठवा रांजणगावचा महागणपती वाचकहो, ही सुरुवात आहे. दर आठवड्यातून एकदा मी आपल्या भेटीस येईन. प्रत्येक वेळी विषय वेगळा असेल, अशी माझी अशी माझी संकल्पना आहे. - आनंद कृष्णाजी कणेक...

अधिक मास व सहस्त्रचंद्रदर्शन

नुकताच अधिक मास समाप्त झाला. काहीजण त्याला मलमास, धोंडा मास, किंवा पुरुषोत्तम मास असेही संबोधतात. हा अधिक मास कसा झाला हे समजावून घेऊ. प्रत्येक महिन्यासाठी एक विशेष देवता आहे. अधिक मासाला मात्र देवता नव्हती. तरीही हा मास श्रेष्ठ मानला जातो तो कसा?  थोडे त्याच्या निर्मिती विषयी. श्री महर्षी व्यास सांगतात, एका वर्षातील बारा महिने म्हणजे एक चांद्र वर्ष होते त्याचा कालावधी अंदाजे ३५४   दिवसांचा. तर एका वर्षातील सूर्याचे बारा राशीतून संक्रमण म्हणजे एक सौर वर्ष. त्याचा कालावधी अंदाजे ३६५  दिवसांचा. त्यामुळे चंद्र वर्ष व सौर्य वर्ष यात दहा-अकरा दिवसांचा फरक पडतो. कालगणनेचा ताळमेळ बसण्यासाठी या दोघांचा मेळ बसवणे क्रमप्राप्त झाले. साधारण दर अडीच वर्षात ह्यामुळे तीस दिवसाचा फरक पडला, म्हणून चांद्र वर्षात एक अधिक मास घेऊन हे सांगड घातली गेली. आता हा महिना कसा ठरवावा? तर ज्या महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही, तो हा महिना धरला गेला. त्यामुळे त्या चांद्र वर्षात बारा ऐवजी तेरा महिने झाले. हा तेरावा महिना म्हणजेच अधिक मास. अधिक महिन्यात ठराविक ऋतू, सणवार, संक्रांत येत नव्हते. लग्न...

पत्ते आणि बोध

आज आपण मनोरंजनाचे साधन व धर्म यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी मी पत्त्याचा कॅट हे साधन वापरणार आहे.  कॅट मध्ये ५२ पत्ते असतात व एक किंवा दोन जोकर असतात. म्हणजेच कमाल पत्ते ५४, रंग दोन - ' लाल व काळा ' व प्रकार ४ - ' इस्पिक , बदाम , किलवर , चौकट '. दोन रंग म्हणजे ' दिवस आणि रात्र '. चार प्रकार म्हणजे चार आश्रम - ब्रह्मचर्य , गृहस्थाश्रम , वानप्रस्थाश्रम , व संन्याशाश्रम . अथवा चार उपाय  - साम , दाम , दंड , भेद अथवा चार वेद  - ऋग्वेद , यजुर्वेद , सामवेद , व अथर्ववेद . एका चांद्रवर्षात ५२ आठवडे येतात हे ५२ आठवडे म्हणजे आपले  ५२ पत्ते. प्रत्येक प्रकारात १३ पत्ते म्हणजे ४×१३ = ५२  आठवडे झाले.  या ५२ पत्त्यांची म्हणजेच एक्का ते राजा यांची बेरीज ३६४ होते त्यात जोकर धरला की झाले ३६५ म्हणजे एक चांद्रवर्ष. दुसरा जोकर समाविष्ट केला तर बेरीज होते ३६६  म्हणजेच ' लीप वर्ष '. ५२ पत्त्यात बारा चित्रपत्ते असतात.. गुलाम , राणी , राजा म्हणजेच ४×३ = १२ यांना आपण बारा महिने संबोधूया.   आता पत्त्यांचा अर्थ लावूया    दुर्री - दोन ग्रह...