Skip to main content

श्री रामरक्षा स्तोत्र सिद्धी विधी

 अध्याय तिसरा


असा हिंदू सापडणे नाही की ज्याची प्रमुरामचंद्रावर श्रद्धा नाही. हे गृहीत धरले तर आपसुकच मनात श्री रामरक्षा रुंजी घालू लागते.

बुधकौशिक ऋषींनी रचलेले हे अनुष्टूप छंदातील काव्य व त्यातील प्रत्येक चरण ज्ञानामृताचा नवीन झरा उत्पन्न करते.

आज अनेक राम भक्तांच्या घरी रामरक्षा पठण हा नित्यउपक्रम आहे. त्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा अवर्णनीय आहे.

या साऱ्याचा विचार करता असे मनात आले की पूर्वी ऋषीमुनी एखादा मंत्र सिद्ध करीत असत आणि अशा सिद्ध मंत्राचा उपयोग समाजाच्या भल्या करता करीत असत. मग आपण रामरक्षा सिद्ध का करू नये? हा विचार मनी धरून मी माझे आध्यात्मिक गुरु परमपूज्य डॉक्टर वसंत पांडुरंग परांजपे यांना विचारले.. त्यांनी मला श्री रामरक्षा सिद्ध कशी करावी याबाबतीतील विधी व मार्गदर्शन केले. हे आपल्यापर्यंत पोहोचण्याची भावना माझ्या मनी निर्माण झाली व त्यातूनच आजचा ब्लॉग 

विधी याप्रमाणे...

  • चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी हे नऊ दिवस अळणी उपवास करावा. 
  • मिठाचे पदार्थ टाळावे. बाकी सर्व खाऊ शकतो. 
  • दहावे दिवशी असा उपवास सोडावा. 
  • या नऊ दिवसात ब्रह्मचर्य पाळावे, सत्य बोलावे, निंदा-चहाडी टाळावी, मन व शरीर शुद्ध ठेवावे.
  • श्री रामाचे चित्र आपल्यासमोर ठेवावे. 
  • निरांजन लावावे व श्री राम रक्षा स्तोत्र सिद्धीसाठी संकल्प करावा.
  • तदनंतर एक माळ गायत्री मंत्र जपावा व एक माळ हनुमान कवचाचे पठण करावे. (हनुमान कवच उपलब्ध नसेल तर हनुमानचालीसाचे पठण करावे)
  • नंतर संपूर्ण रामरक्षा स्तोत्र अकरा वेळा म्हणावे त्यानंतर पुन्हा गायत्री मंत्राची एक माळ जपावी.
  • असे नऊ दिवस करावे.
  • या नऊ दिवसात जसे जमेल तसा "ॐ श्रीरामाय नमः" अथवा "श्रीराम जय राम जय जय राम" वा तत्सम मंत्र जपावा.
  • समाप्तीचे रात्री होम व ब्राह्मण भोजन करावे.
असे केले असता श्री रामरक्षा सिद्ध होते.

हे ९९  (९ X ११) पाठ तारणहार आहेत. सिद्ध झाल्यावर कुठलाही रोग व भूत पिशाच्च बाधा झालेल्या  व्यक्तीच्या जवळ बसून, हातात विभूती घेऊन रामरक्षा म्हणावी व ती अभिमंत्रित विभूती आजारी किंवा बाधित व्यक्तीस लावावी.  फरक जाणवतोच.

'स्वार्थासाठी याचा उपयोग कधीच करू नये'

एक वेळा उच्चारलेले रामनाम सहस्त्रवेळी उच्चारलेल्या विष्णू नामाचे पुण्य प्रदान करते. रामरक्षेत तसा उल्लेख आहे.

 राम रामेति रामेति ,रमे रामे मनोरमे, सहस्त्रनाम तत्तुल्यमं राम नाम वरानने |

 हा प्रयोग जरूर करून पहा. फलप्राप्ती नक्कीच होईल. 

 जय श्री राम! 🙏

पुढील भेटीत नवीन विषय नवा विचार. 

Comments

  1. उपयुक्त माहिती . अलका

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रथम वंदन

नमस्कार मंडळी.  माझ्या "श्रीगणेश पूजा विधि" या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकाला गणेश भक्तांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यामुळे मला मिळालेली उमेद असे सांगत होती की आपल्या हिंदू धर्मात अशा अनेक प्रथा आहेत आणि अशी माहिती आहे जी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ती जतन करणे आवश्यक आहे जसे की आजीबाईचा बटवा इत्यादी. याच्या अनुषंगाने मी विविध विषयांना आजपासून स्पर्श करण्याचा आणि ते विषय आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. अपेक्षा ही आहे की माझा हा संकल्प आपल्या पसंतीस उतरेल. कुठल्याही कामाची सुरुवात करताना गणेशाला वंदन करूनच आपण करतो.  ॐ गं गणपतये नमः | अष्टविनायकांची नावे याप्रमाणे:  मोरगावचा मयुरेश्वर  सिद्धटेकीचा सिद्धिविनायक  पालीचा बल्लाळेश्वर  मढचा वरदविनायक  थेऊरचा चिंतामणी  लेण्याद्रीचा गिरिजात्मक  ओझरचा विघ्नेश्वर  आणि आठवा रांजणगावचा महागणपती वाचकहो, ही सुरुवात आहे. दर आठवड्यातून एकदा मी आपल्या भेटीस येईन. प्रत्येक वेळी विषय वेगळा असेल, अशी माझी अशी माझी संकल्पना आहे. - आनंद कृष्णाजी कणेक...

अधिक मास व सहस्त्रचंद्रदर्शन

नुकताच अधिक मास समाप्त झाला. काहीजण त्याला मलमास, धोंडा मास, किंवा पुरुषोत्तम मास असेही संबोधतात. हा अधिक मास कसा झाला हे समजावून घेऊ. प्रत्येक महिन्यासाठी एक विशेष देवता आहे. अधिक मासाला मात्र देवता नव्हती. तरीही हा मास श्रेष्ठ मानला जातो तो कसा?  थोडे त्याच्या निर्मिती विषयी. श्री महर्षी व्यास सांगतात, एका वर्षातील बारा महिने म्हणजे एक चांद्र वर्ष होते त्याचा कालावधी अंदाजे ३५४   दिवसांचा. तर एका वर्षातील सूर्याचे बारा राशीतून संक्रमण म्हणजे एक सौर वर्ष. त्याचा कालावधी अंदाजे ३६५  दिवसांचा. त्यामुळे चंद्र वर्ष व सौर्य वर्ष यात दहा-अकरा दिवसांचा फरक पडतो. कालगणनेचा ताळमेळ बसण्यासाठी या दोघांचा मेळ बसवणे क्रमप्राप्त झाले. साधारण दर अडीच वर्षात ह्यामुळे तीस दिवसाचा फरक पडला, म्हणून चांद्र वर्षात एक अधिक मास घेऊन हे सांगड घातली गेली. आता हा महिना कसा ठरवावा? तर ज्या महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही, तो हा महिना धरला गेला. त्यामुळे त्या चांद्र वर्षात बारा ऐवजी तेरा महिने झाले. हा तेरावा महिना म्हणजेच अधिक मास. अधिक महिन्यात ठराविक ऋतू, सणवार, संक्रांत येत नव्हते. लग्न...